मी माझी पहिली गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी केली. तोपर्यंत मी माझ आयुष्य वायाच घालवल.
नमस्कार,
वॉरन बफे यांच्याबद्दल मी काय सांगु, सगळ्यांना
अगोदरच माहीतच असेल. मी ज्यांच्यापासून गुंतवणूक करायला प्रेरित झालो ते माझे गुरु
म्हणूजे वॉरन बफे. वॉरन बफे हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आहेत.
आपल्या वयाच्या अकराव्या वर्षी वॉरन बफेने” सिटि सर्विसेस” नावाच्या
तेल कंपनीचे तीन शेअर्स प्रतिशेयर 38 डोलर्सच्या किमतीला विकत घेतले, हे वाचून
आपल्यापैकी अनेक जणांना धक्काच बेसल. ज्या वयात आपल्याकडे मुलांना आपल्या बँकाच्या
खात्याविषयीसुद्धा माहिती नसते , त्या वयात वॉरन बफे तीन शेअर्स विकतसुद्धा
घेतले होते! कहर म्हणजे हे शेअर त्यान विकत
घेतल्यानंतर काही काळातच त्याची किमत पार घसरली आणि ती प्रतिशेयर 27 डॉलरवर आली. भल्याभल्या
वयस्कर गुंतवणूकदारांची यामुळे धांधल उडाली असेल आणि बहुतेक जणांनी अश्या परिस्थितीत
आपल्याकडचे शेअर्स नुकसान सोसून विकून टाकले असतील. बफेने मात्र हुशार गुंतवणूकदार
होऊन एका शेअर ची किमत 27 डॉलर वरुण 40 डोलरपर्यंत जाईपर्यंत वाट बघितली आणि नंतर आपल्याकडचे
शेअर्स विकून टाकले. यातूनच गुंतवणुकीतून यश मिळवण्यासाठी खूप वाट बघावी लागू शकते
, हा पहिलं आणि अत्यंत महत्वाचा धडा तो शिकला.
कहर म्हणजे हे सगळं करून झाल्यावर आपल्या
उतारवयात आपण ‘खूप उशिरा’ गुंतवणूक सुरू केली अस बफे म्हणतो!
यातून बफेचा अमर्याद उत्साह, त्याची सकारात्मक वृत्ती आणि यश मिळवण्यासाठी त्याच्या मनातली घालमेल या
गोष्टी आपल्यासमोर येतात. आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबासाठी हा अत्यंत बोलका धडा आहे. इतक्या लहान वयात मुलांना काय कळत? अस म्हणून आपण त्यांनी गुंतवणूक करण्याची संकल्पना विचारतसुद्धा घेत नाही.
याचा कारण म्हणजे स्वत: पालकच या बाबतीती निष्काळजी किंवा अज्ञानी असतात. पैसे कमावण्यासाठी
ते रात्रदिवस धडपडतात आणि कामावलेले पैसे आपल्याला पुरतील का नाही, याची सतत चिंता करत राहतात. कमाईचा प्रश्न किमान काही अंशी सोडवण्याची धमक
गुंतवणुकीत असते: पण इतक्या महत्वाच्या प्रश्नाकडे कुणाचं लक्षसुद्धा
जात नाही.
बफेच्या या विधांनाला आधीच्या चक्रवाढ
व्याजाच्या संकल्पनेचाही संदर्भ आहे. यासाठी आपण एक सोप उदाहरण घेऊ. समजा, आपण गुंतवणुकीच्या
या सगळ्या गोष्टीपासून पार दूर गेलो; पण एक गोष्ट मात्र केली. ही गोष्ट म्हणजे, आपल मूल पाच
वर्ष वायच असताना त्याच्या नावानं भारतामधल्या एखाद्या चांगल्या म्यूचुअल फंड योजनेत
10 हजार रुपये फक्त एकदाच गुंतवले आणि आपल मूल मोठ होऊन चाळीशी गाठेल तेव्हाच हे पैसे
त्याने काढून घ्यायचे अशी योजना आखली , तर काय होईल? या मुलाच्या चाळीशीच्या सुमाराला मूळच्या 10 हजार रुपयांचे सध्याच्या अंदाजानुसार
जवळपास 33 लाख रुपये झालेले असतील! जर तो मुलगा आणखी पाच वर्ष थांबला आणि त्यान आपल्या
वयाच्या 45 व्या वर्षी हे पैसे काढून घ्याचे ठरवले, तर त्याच्याकडे
60 लाख रुपये झालेले असतील!
यातून एक गोष्ट स्पष्ट होते. गुंतवणुकीतून
यश मिळवण्यासाठी प्रत्येक माणसानं अवघड संकल्पना समजून घेण, सातत्यानं
शेअर बाजाराकडे नजर लावून बसण, वाचन करण यातलं काही गरजेचं नसत.बफे
जेव्हा आपण ‘खूप उशिरा’ गुंतवणुकीला सुरवात केली आस म्हणतो, याचा सोपं अर्थ
आपण आपल्या मुलांना लवकर गुंतवणूक करण्याविषयी प्रशिक्षण देन असा तर होतोच; पण ते शक्य नसेल तर त्याच्या नावाने शेअर बाजारात किंवा शेअर बाजाराशी संबधित
असलेल्या म्यूचुअल फंड योजनेत शक्य तितक्या लवकर शक्य तितकी रक्कम गुंतवून शक्य तितक्या
काळासाठी त्याविषयी विसरून जाव, असा अर्थ त्यातून निघू शकतो .
नक्की कोठे गुंतवणूक करावी हे अर्थातच गुंतवणूक
सल्लागाराकडून सहजपणे समजून घेता येईल.
धन्यवाद
मराठी अनुवाद - अतुल कहाते
Post a Comment