पहिले मोनिका हलान यांनी लिहिलेला हा Thread बघा English मधून आहे . खाली मी मराठी मधून Explain करण्याचा प्रयत्न करत आहे .
एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?
कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance ,ULIP जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे ( CAGR म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या पोंलिसी ने प्रत्येक वर्षी किती % परतावा दिला ) आणि महागाईचा दर ( Inflation Rate ) जवळपास 7-8% आहे .म्हणजे महागाई दरा पेक्षा या सर्व पॉलिसी कमी परतावा देत असल्यामुळे तुमची संपत्ती निर्माण नाही होऊ शकत.
तसेच मध्ये पैसे काढले तर 40 ते 50% रक्कम लॉस मध्ये घ्यावी लागते . 80% Policies तर मार्च मध्ये टॅक्स Saving च्या नावाखाली विकल्या जात आहेत आणि आपणही Tax Save करायचं म्हणून खरेदी करत आहोत पण सत्य परिस्थिती वेगळी आहे . आपण पाहूया कि , _खरच ULIP, Money Back , Endowment plan या विविध प्रकारच्या पोलीसी ची गरज एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला आहे का ? उत्तर नाही .
✅ Poor_Life_Cover :- वरील कोणत्याहि Policies पूर्ण life Insurance cover देत नाही कारण यामध्ये Insurance + Investment दोन्हीचे मिश्रण असल्यामुळे नाही Proper इन्सुरंस भेटत आहे नाही योग्य ठिकाणी गुंतवणूक होत आहे. Adequate इन्सुरंस म्हणजे जर एखाद्याचा वर्षाचा पगार हा ५ लाख असेल तर त्याला वर्षाच्या पगाराच्या १५ ते २० पट insurance ची गरज असते उदाहरण - ५ लाख वर्षाचा पगार x १५ पट = ७५ लाख पण या Policies मध्ये असणारे insurance चे cover 1 लाखापासून ते ५ लाखापर्यंत असते जे कि त्याच्या Family साठी खुपच कमी आहे.
✅ Poor_Return – वरील सर्व Policies चा मागील २० वर्षचा IRR (Internal Rate of Return ) जर काढला तर तो ५ ते ६ % पेक्षा जास्त नाहीये म्हणजे या Policies ने प्रत्येक वर्षी ६% पेक्षा परतावाही नाही दिलेला जो कि महागाईपेक्षा कमी आहे .
जिथे गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत तिथे आपण पोहचत नाही कारण एक तर आर्थिक शिक्षणाचा अभाव किंवा दुसरे मुद्दाम आल्याला सत्य परिस्थिची जाणीव न करून अश्या policies मध्ये अडकवले जाते.
✅Built_Like_Trap– या Policies अश्या असतात कि जर एखाद्या ने यामध्ये गुंतवणूक चालू केलीतर मध्ये तुम्ही बंद नाही करू शकत आणि जर तुम्ही बंद करताय तर खुप मोठा LOSS सहन करावा लागतो जसे :- एखाद्या व्यक्तीला 1 वर्षाने policy बंद करायची असल्यास त्याला १००% LOSS म्हणजे शून्य रुपया भेटेल ,ऐकले तर नवल आहे पण सत्य आहे . पुढे ५ वर्षाने जरी त्याला बंद करायची असेल तर भरलेल्या रकमेच्या ५०% रक्कम त्याला भेटते उदाहरण :- ५ वर्षात 1 लाख भरले असेल तर ५ वर्षाने ५०००० रुपये भेटतील. काही Policies अश्या आहेत कि १०-१५ वर्ष पैसे भरूनही loss मध्ये किंवा जेवढे भरले तेवढे पैसे भेटत आहेत . तर अश्याप्रकारच्या Policies तुमच्यासाठी योग्य आहेत कि नाही याचा एकदा विचार करायला हवा आणि आपले कोणते ध्येय या Policies पूर्ण करत आहेत एकदा बघायला हवे .
What happens if you change your mind? Suppose you were hard sold or mis-sold and you want to exit? It's going to cost you big.
Most traditional plans are sold as 5 year plans. What happens when you surrender after 5 years?
Agent, company and shareholders profit. You lose.
सारांश पहिला आपण या सर्व Policies चा तर या Policies विक्रेता ( एखादा घरातला काका,मामा किवा मित्रच असतो ) , कंपनी, Shareholder यांच्यासाठी फायद्याच्याआहेत तुमच्यासाठी loss-making मशीन आहे . थोडेसे आर्थिक शिक्षण घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घ्या किवा एखादा चांगला आर्थिक सल्लागार निवडा .
Conclution : -
वरील सर्व Policies वर असणारा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे Insurance घेताना Only Pure Vanila Term_Insurance घ्या आणि गुंतवणूक करताना एखादा चांगला आर्थिक सल्लागार निवडून विविध ठिकाणी आपले आर्थिक ध्येय ठरवून मग त्यानुसार गुंतवणूक करा .
जसे – 🟦PPF, NPS, GOLD, Real Estate, Mutual Fund , Debt Fund, Stocks 🟦_
अशा करतो तुम्हाला थोडेतरी Insurance policies बद्दल समजले असेल .
धन्यवाद 🙏
अधिक लोकांपर्यंत पोहचवा .
अशा करतो तुम्हाला थोडेतरी Insurance policies बद्दल समजले असेल .
धन्यवाद 🙏
अधिक लोकांपर्यंत पोहचवा .
Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
Post a Comment