मध्यमवर्गीय कुटुंबाचे आर्थिक नियोजन कसे असते
मी पाहिलेले काही अनुभव मी इथे सांगत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( Financial Freedom ) प्राप्त नाही करता येत.
आपण ही माझी पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद !
अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते. जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर ( HOME EMI ) घर घेतात पुढील 20 वर्षाच्या कर्जावर. आर्थिक स्वातंत्य न मिळवता येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कोणतेही नियोजन न करता लवकर Home Loan घेणे.
12-15 तास काम करून त्यांचे पैसे Amazone-फ्लिपकार्ट , झोमेटो-स्वीगी,पिझ्झा, अॅपल मोबाइल,कार, ब्रांडेड गोष्टीववर खर्च होतात. त्यांना कितीही बोनस , कितीही Increment , Promotion मिळाले तरी ते आहेत तिथेच राहतात अगदी 1 लाख रुपये पगार 2 लाख झाला तरीसुद्धा त्याच्या अडचणी चालू राहतात कारण, त्यांच्याकडे आर्थिक शिक्षण नसते.
मध्यमवर्गीय कुटुंब पैसा कमवाण्यासाठी 8 ते 12 तास घालवतात पण त्याच्या 1% वेळ पण, आलेल्या पैशयाचे कसे नियोजन करावे ह्यासाठी देत नाहीत नंतर ते पैशयाच्या इतके कचाट्यात अडकतात की पती ,पत्नी पैकी कोणीही जॉब सोडू शकत नाही अगदी ते आपल्या मुलांना पण पाळण्याघरात ठेवतात तर कारण , पती घर खर्च चालवत असतो आणि पत्नी च्या पगारातून Home Loan, Car Loan जात असते . एकाच्या पगारावर घर चालवणे त्यांना शक्यच नसते.
पुढे 35-40 वय असताना कंपनी मध्ये पोस्ट वाढलेली असते आणि येवढ्या पगारची नोकरी दुसरीकडे मिळणे कठीण असते . दुसरीकडे मूल मोठी झालेली असतात, त्यांचा खर्च आता खूप वाढलेला असतो. पत्नीला कोठे तरी थांबावे वाटते आणि मुलांकडे लक्ष द्यावेसे वाटते पण, कर्जात ( EMI ) अडकल्यामुळे तिलाही काही करता येत नाही. मग काय 1, 2 महीने जरी पगार आला नाही तर सगळे थांबणारे असते. ( तुम्ही सगळे आता करोंना मुळे अनुभवात आहात ).
मध्यमवर्गीय कुटुंबातील 75% लोक हे Private Company मध्ये जॉब ला असतात. कोणतीही पेंशन नाही , निवूर्त्ति नंतर त्यांना फक्त PF आणि Gratuity ची रक्कम मिळते. त्यात त्यांचे काहीच वर्ष चालतात अगदी 2 , 3 नंतर त्यांना आयुष्याच्या अश्या संकटांना उत्तर द्यावे लागतात की जे त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल आणि यालाच आर्थिक भाषेत Rat Race म्हणतात. यात अडकायचे नसेल तर आर्थिक शिक्षण समजून घ्या नाही तर आयुष्य भर 9 ते 5 जॉब करत बसाल.
योग्य प्रकारे आर्थिक शिक्षण घेतल्यास आपण कसे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. माझ्याजवळ असलेले आर्थिक शिक्षणाचे नॉलेज मी 100% देण्याचा प्रयत्न करेन.
योग्य प्रकारे आर्थिक शिक्षण घेतल्यास आपण कसे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. माझ्याजवळ असलेले आर्थिक शिक्षणाचे नॉलेज मी 100% देण्याचा प्रयत्न करेन.
आपण ही माझी पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद !
तुमचे काही प्रश्न ,शंका असल्यास तुम्ही पेज ला मेसेज करू शकता तसेच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो, मला Personally Contact करा.
धन्यवाद ।
-चला आर्थिक स्वातंत्र्य मिळूया-
Post a Comment